25/08/2026
बहिण भावाचं नातं.....
मी घरात सर्वात मोठी आणि माऊ सर्वात लहान. सर्वात लहान असल्यामुळे सगळ्या कुटुंबाचा तो लाडका. कधी जबाबदारी पडला नव्हत्या. माझा आजारपणा आला तेव्हा त्याचं शिक्षण सुरू होतं.
पण माझा आजारपणच्या पद्धतीने त्याने सगळं हँडल केलं त्यासाठी सगळ्यांनी त्याच कौतुक केलं. त्यांनी माझ्या वडिलांना सुद्धा हॉस्पिटलला येऊ दिलं नाही. मी घरीच थांबा मी थांबतो दीदी जवळ. माझ्या दुसऱ्या ऑपरेशनच्या वेळेस आम्ही दोघंच बहिण भाऊ होतो हॉस्पिटलला. रेडिएशनच्या वेळेचे महत्व आम्हाला नागपूरला घेऊन गेला. रूम बघण्यापासून ते रूम मध्ये सगळं त्यांनी एका दिवसात, कुलर, फॅन ,लाइट्स सगळी व्यवस्था करून दिली.
जाताना म्हणाला दीदी मोबाईल मध्ये रिचार्ज करतो अनलिमिटेड नेट पॅकच.nirvi ल रूम बाहेर जाऊ देऊ नको कुठे..
शेतात त्यावेळेस तुर तयार करायची राहिली होती. वडिलांच्या अनुपस्थितीत त्याने अगदी शेतीचा मल तयार करून घेतला. अगदी सगळ्यांनी त्याचा खूप कौतुक केलं....
त्या परिस्थितीत त्यांनी माझी साथ दिली त्याच्या पलीकडे मला काही नको होत.
आता हा पुढचा प्रवास माझा होता. नशीब माझं होतं. त्यामुळे आता हा जो प्रवास आहे तो माझा मी गाठणार. अडीअडचणीला ही माणसं माझी असणारच आहे मला माहित आहे.
मी माहेरी राहते. पण त्या नात्यामधला गोडवा कमी होऊ द्यायचा नाही हेही मला कळतं. आज आम्ही एका घरात राहतो आनंदाने राहतो. एकमेकांबद्दल अतिशय प्रेम जिव्हाळा आम्हाला आहे.
पण त्या नात्यासाठी आपल्यालाही आपल्या मर्यादा माहित असल्या पाहिजेत. मी व्यावहारिक वागते. आज तर मी त्याच्याकडून शंभर रुपये घेतले तर मी लगेच त्याला परत करते. कुठल्याही प्रकारचा हक्क, राग, हट्ट माझा नसतो.
मी बऱ्याच बहिणी बघते. घरी सगळं असूनही, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या असूनही भावावर रुसतात. मला एवढ्याचीच साडी पाहिजे, मला पैसे पाहिजेत. अगदी लूटतात भावाला. आणि यामुळे अनेक बहीण भावाची नाती मी खराब होताना बघितली आहेत.
आम्ही आठ बहिणी आहोत कुटुंबात. आम्ही जेव्हा माहेरी येतो तेव्हा आमचा कुठलाच हट्ट नसतो. बहिणींना पावनचार सुद्धा नको असतो. घरी सगळं खातोग.. काय त्यात स्वयंपाकात सगळा वेळ जातो. काही करू नको पावनचार गोडधोड.दोन दिवसाची भेट, आनंदाचे क्षण, आपुलकी प्रेम हे माहेरून घेऊन जाणे जास्त आवडतं.
कारण आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे मदतीला शेवटी भाऊच असणार आहे. आणि आई-वडिलांनंतर तोच आमचा आई-वडील म्हणून नाती निभवणार आहे.
पण समजूतदारपणा येत असतो, त्याचाही संसार आहे. त्याच्याही आता जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या गोष्टींसाठी, पैशांसाठी भावाकडे हट्ट कशाला...
आमच्या मुलांची दवाखानेही तूच कर, बिलही तूच भर, जॉब वरून सुट्टी ही तूच घे अशी मानसिकता बहिणीने ठेवली तर ते नातं फाटल्याशिवाय राहत नाही.
काही जण अगदी नात्यांमध्ये इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात. आणि कधीकधी नाईलाजाने, एखाद्या भावाला ते नात्यांच ओझं सगळे दुःख मनात ठेवून वाहव लागत....
त्यामुळे बहिण भावाच्या या नात्याची कदर प्रत्येक बहिणीने आणि भावाने दोघांनीही केली पाहिजे. संकटाच्या काळात एकमेकांसाठी आपण आहोतच. प्रत्येकाचा आपला एक वेगळा संसारआहे. त्याच्यावरही कोणाची तरी जबाबदारी आहे, तोही कुणाचा आता सर्वस्व आहे ही नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे.
या विचारसरणीतूनच हे नातं मला असं वाटते अजून दृढ होत जातं. त्यातला गोडवा प्रेम अजून वाढत... फक्त आपल्याला आपल्या काही मर्यादा माहीत असल्या पाहिजेत.