Dr Praful D Pimple

Dr Praful D Pimple we offering advance care with Ayurveda speciality

          sadguruclinic
04/04/2026

sadguruclinic

          sadguruclinic
04/04/2026

sadguruclinic

21/03/2026
दै. लोकमत दिनांक १९/०५/२०२४
19/05/2024

दै. लोकमत दिनांक १९/०५/२०२४

01/05/2024

लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा हृदय रोग, मुलींमध्ये आढळणारा आजार म्हणजे पीसीओडी. असे अनेक आजार आहेत की ते आहार...
23/01/2024

लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा हृदय रोग, मुलींमध्ये आढळणारा आजार म्हणजे पीसीओडी. असे अनेक आजार आहेत की ते आहाराशी संबंधित आहेत. त्यांना आहारनिर्मीत चयापचय व्याधी असे म्हणतात. म्हणून ह्या आहाराविषयी जागृती असणे गरजेचे आहे.

आजच्या काळात आहारतज्ज्ञांचं महत्त्व
होय, पुर्वीच्या काळी आहारतज्ज्ञ नव्हते असं नव्हतं परंतु त्यापेक्षा आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक नवनवीन आजार वाढीस लागलेले दिसतून येतात. म्हणून आहार तज्ज्ञांचे महत्व वाढलेले दिसून येते.

लठ्ठपणा वाढण्याची कारणे
आपल्या जीवन शैलीचा अविभाज्य घटक म्हणजे आहार. आणि त्याबरोबर येणारा व्यायमाचा अभाव. ह्या समस्या प्रामुख्याने जाणवतात. व्यायामाला योग्य वेळ देऊन तो करणे गरजेचे आहे. तसेच जंकफूड/ फास्ट फुड खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे अनावश्यक कॅलरीज वाढतात. ज्याप्रमाणे औषध घेण्याचे प्रमाण ठरलेले असते त्याच प्रमाणे योग्य आहार घेण्याच्याही वेळा ठरलेल्या असाव्यात. जर वेळी अवेळी जेवण केले, अनावश्यक आहार घेतला तर लठ्ठपणा वाढीस लागतो.

संतुलीत आहार म्हणजे काय
संतुलीत आहार म्हणजे टेलरमेड आहार. प्रत्येक व्यक्तीचा आहार हा टेलरमेड असावा. थोडक्यात आपल्या शरीराची क्षमता व आवडी निवडी लक्षात घेऊन आपला आहार हा ठरलेला असावा त्यालाच समतोल व संतुलीत आहार असे म्हणतात. त्यात व्हिटॅमिन्स, कर्बोदके, प्रथिने यांचे प्रमाण असावे.

चांगला प्रथिनयुक्त आहार
चांगल्या प्रकारची प्रथिने म्हणजे ज्या प्रथिनांमध्ये इसेन्शीअल अॅमानोअॅसिडचे प्रमाण योग्य आहे. यालाच आपण प्रोटीन असे म्हणतो. हे अॅमानोअॅसिड थोड्या-थोड्या प्रमाणात कडधान्य व धान्यात आढळून येते. उदा.: गहू, तांदुळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ इत्यादींमध्ये आढळून येते. आपल्या जेवणात भाकरी, गहू, वरणभात असे अन्नपदार्थ असतात. तसेच गाईचे दूध, तुप, पनीर, अंडी, मासे इत्यादींपासूनही उत्तम प्रोटीन्स मिळतात. जेव्हा दोन पदार्थ एकत्र करतो तेव्हा त्याची आवश्यक अॅमानो अॅसिडची पातळी योग्य प्रमाणात वाढलेली असते. म्हणून अशा पद्धतीने योग्य आहार घेतला गेला पाहिजे.

चौरस आहार कोणता
आजच्या जीवन शैलीमध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी झालेले आहे. एका माणसाला साधारणता ३५ ग्रॅम तंतुमय पदार्थांची आवश्यकता असते. पालेभाज्यांमध्ये तंतुमय पदार्थांची मात्रा जास्त असते. त्यासाठी आहारात जास्तीत जास्त पालेभाज्यांचा समावेश असावा. त्याचबरोबर रोजच्या आहारात काकडी, गाजर किंवा पालेभाज्यांचे प्रमाण असावे, जेणेकरुन तंतुमय पदार्थांची गरज काही प्रमाणात भागविली जाईल.

फल आहार कधी?
फळांमधून आपल्याला प्रथिने आणि खनिजे मिळतात. म्हणून रोजच्या जीवनात फळांचा समावेश जरुर करावा. फळे खातांना ते सालीसह खावेत त्यात जीवनसत्वांचे प्रमाण जास्त असते. पेरु, पपई, पेर, संत्री, मोसंबी, लिंबू या फळांमधून प्रथिने आणि खनिजे जास्त प्रमाणात मिळतात. म्हणून ही फळे जास्त खावीत.

दैनंदिन जीवनात साखरेचे प्रमाण
साखर म्हणजे पांढरे विष आहे. आपल्या शरीरासाठी साखरेचे जास्त प्रमाण हे घातक असते. म्हणून साखरेचे प्रमाण हे अल्पप्रमाणात असावे. एकंदरीत आहार घेतांना जे सकस आणि संतुलीत पदार्थ आहे त्यांचे प्रमाण जास्त असावे. त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

साखरी पासून दूर राहणं जसं आरोग्यासाठी चांगलं आहे तसेच मला असं वाटतं आज-काल श्वसनाची विकार वाढत चालले आहे वाढतं प्रदूषण असेल किंवा इतर काही कारण असतील पण श्वसनाच्या या विकारांवर एक चांगला विलास म्हणजे आणि आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो तो म्हणजे मध चांगल्या प्रतीचा मध हा जर का रोज सकाळी एक चमचाभर घेतला आणि त्यात चुटकीभर दालचिनी जर का टाकली तर श्वसनाच्या अनेक आजारांपासून दूर राहता येते मध हा आयुर्वेदानुसार रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ही उत्तम समजला जातो दालचिनीने रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते

पूर्वीच्या तुलनेत आजकाल अनेक नवनवीन खाद्यपदार्थ आपल्याला मिळत आहेत मग ती इटालियन असेल चायनीज असेल परंतु ती पचवण्याची क्षमता आपल्याला निर्माण करावी लागते कारण ज्या पद्धतीचा अन्न आपल्याकडे उगवतो त्याच पद्धतीचे आपली पचन संस्था असते मग जर अशा पचन संस्थेला त्रास देणाऱ्या गोष्टी आपण आहारात घेत असो तर आपल्याला त्या पचनसंस्थेवरही काम करावे लागेल मला असं वाटतं यासाठी वावडिंग हे उत्तम काम करते त्यामुळे रोजच्या जेवणानंतर बडीशोप सोबत दोन वावडिंगाचे दाणे खाणे ही योग्य आहे याने लहान मुलांना होणारे जंताचा त्रासही कमी होतो....

आपण बनवत असलेल्या भाज्यांना एक चांगली चव यावी म्हणून जसं कसुरी मेथी वापरली जाते मला असं वाटतं त्याच पद्धतीने जर का शेवग्याचा पाला वापरला गेला तर हे अतिशय उत्तम ठरू शकतो चवं कशी लागेल मला माहित नाही पण जवळपास सगळ्यात खजिनांचा आणि विटामिन चा पुरेपूर साठा हा शेवग्याच्या पानांमध्ये आहे

आजकाल वाताची दुखणे खूप वाढत आहेत संधिवात तर जणू सगळ्याच घराघरांमध्ये पसरला आहे 35 40 वर्षाची मुलं म्हणतात की आमचे गुडघे दुखायला लागले यासाठी आहारामध्ये तेल बियांचा वापर जसे तीळ तेल असेल एरंड तेल असेल कराळ आणि जवस असेल शेंगदाणा असेल यांचा पुरेपूर वापर आहारामध्ये झाला पाहिजे

अर्थात इटालियन चायनीज ही जी पाश्चिमात्य खाद्यपदार्थ आहेत हे खाऊच नका असं तर मी म्हणणार नाही पण यावर नियंत्रण मात्र नक्कीच हवं.... कारण पचन संस्थेचा विचार केला तर या खाद्यपदार्थांमुळेच बरेचसे आजार उद्भवत आहेत असं लक्षात येतं

डॉ. प्रफुल दत्तात्रय पिंपळे
सद्गुरू क्लिनीक
छ. संभाजीनगर
📲 9422693239

★★★★★ · Medical clinic

06/09/2023
After long time attending a surgery with Great Orthopedic Surgeon in Ch. Sambhajinagar Dr Santosh Ranjalkar Sir ...
09/08/2023

After long time attending a surgery with Great Orthopedic Surgeon in Ch. Sambhajinagar Dr Santosh Ranjalkar Sir ...

Address

Shiv Jyoti Colony N6 CIDCO Near Avishakar Colony
Aurangabad
431001

Telephone

+919422693239

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Praful D Pimple posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category