09/08/2026
मूळ सोडून भलत्याकडेच लक्ष: त्रास औषधाने झाला की अपथ्याने?
काल रात्री मला एका पेशंटचा फोन आला. "डॉक्टर, रात्री मूळव्याधाचा भयंकर त्रास झाला, टॉयलेटला खूप त्रास होतोय..." आणि लगेच पुढचा प्रश्न, "तुमच्या औषधामुळे तर हा त्रास वाढला नसेल ना?"
मी शांतपणे त्यांना विचारलं, "रात्री जेवणात काय खाल्लं होतं?" त्यावर ते म्हणाले, "रात्री खूप उशिरा जेवलो आणि मसालेदार नॉनव्हेज खाल्लं होतं."
आता मला सांगा, त्रास औषधामुळे झाला की रात्री उशिरा खालेल्या त्या मसालेदार अन्नामुळे? हीच आपली खरी समस्या आहे—"चोर सोडून संन्यासाला सुळावर देणे!" मूळ कारणाकडे डोळेझाक करून भलत्याच गोष्टीवर दोष ढकलण्याची वृत्ती आपल्या रक्तातच भिनली आहे.
इमॅजिनरी जग विरुद्ध वास्तव
भारतात लोकांना प्रत्यक्ष 'फॅक्ट्स' (Facts) समजून घेण्यापेक्षा काल्पनिक आणि सोयीस्कर गोष्टींवर विश्वास ठेवायला जास्त आवडतं. कोणतीही अडचण आली की त्याचं मूळ शोधण्याऐवजी आपण भलत्याच गोष्टीला जबाबदार धरतो. ही वृत्ती फक्त आरोग्यापुरती मर्यादित नसून सर्वच क्षेत्रात दिसते:
* प्रदूषण आणि कचरा: आपली शहरं, गावं, हवा, पाणी सगळं प्रदूषित झालंय. नदीत सीवेजचं पाणी सोडायचं, घरातला कचरा रस्त्यावर फेकायचा, अस्थिविसर्जन आणि कचरा डॅमच्या पाण्यात टाकायचा... आणि मग आजार वाढले की नशिबाला किंवा सरकारला दोष द्यायचा!
* आरोग्य: पथ्य न पाळता तेलकट-मसालेदार खायचं आणि त्रास झाला की डॉक्टरांच्या औषधांना नावं ठेवायची.
* पर्यावरण: जे दूषित पाणी आपण नदीत सोडतो, तेच फिरून डॅमद्वारे आपल्या घरात पिण्यासाठी येतं. याचा परिणाम इतका घातक होतोय की येत्या काळात मानवजात टिकेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जाणीवपूर्वक की अज्ञानातून?
हे लोक जाणीवपूर्वक करतात की त्यांना खरोखर समजत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. पण मूळ समस्येकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या चुका लपवणं आता थांबलं पाहिजे.
जेव्हा आपण आजाराचं, पर्यावरणाचं किंवा कोणत्याही समस्येचं 'मूळ कारण' शोधून त्यावर काम करू, तेव्हाच खरं परिवर्तन होईल. दोष औषधाला किंवा परिस्थितीला देण्यापेक्षा स्वतःच्या सवयी आणि जीवनशैली बदला. मूळ फॅक्टवर लक्ष द्या, काल्पनिक गोष्टींवर नाही!
डॉ.संतोष महानोर
मो.नं.7038375915