Akshayya Ayurved

Akshayya Ayurved This Clinic is Devoted towards Authentic Ayurvedic Treatment contains both Shaman and Shodhan treatment.

It is my mission to establish an authentic practice of Ayurveda of the highest quality. In addition to this, I want to make it available to patients from all over the globe. I believe that Ayurveda is not only just pathy to cure the disease but also the way of life……. ….

कोरोना आणि समाजाची मानसिकताजगभरामध्ये कोरोना चे मांडलेले थैमान आणि कोरोना योध्यांचे त्याच्या विरूद्ध चाललेले प्रयत्न हे ...
27/04/2020

कोरोना आणि समाजाची मानसिकता

जगभरामध्ये कोरोना चे मांडलेले थैमान आणि कोरोना योध्यांचे त्याच्या विरूद्ध चाललेले प्रयत्न हे वाखाणण्याजोगे आहेत. पण काही ठिकाणी यांच योध्यांच्या विरुद्ध घडणाऱ्या घटना बघून वाईट वाटते. हे लोक जीवाचे रान करून आपल्या घरच्यांपासून लांब राहून रुग्णांना सेवा देत आहेत आणि आपण त्याची परतफेड म्हणून त्यांनाच त्रासात टाकत आहे. लोक स्वतःहून पुढे येण्यापेक्षा या गोष्टी लपवून ठेवत आहेत यामुळे कोरोना च्या प्रसाराला हातभार तर लागतच आहे पण तो थांबवण्याच्या प्रयत्नांना पूर्ण यश मिळेना झालेय. काय असेल हे लपवून ठेवायची मानसिकता, का जातात या निर्णयाला लोक?

कारणे बरीच असू शकतात पण एक महत्वाचे कारण आहे तो म्हणजे समाजाचा रुग्णाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि महत्वाची काही कारणे .

1. भीती

जेंव्हा हा आजार आला तेंव्हा पासून एक गोष्ट बघण्यात येत आहे की डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना राहत्या घरातून बाहेर काढले जाते, त्यामागे भीती हे कारण आहेच पण एक गोष्ट लक्षात का येत नाही? की उद्या आपल्यालाच हा आजार झाला तर हेच लोक आपल्याला वाचवणार आहेत हेच लोक आपल्या मदतीला येणार आहेत. हेच लोक आहेत जे स्वतःचा जीव हातावर घेऊन आपल्याला सेवा देतात.

2. बहिष्कार

एखाद्याला कोरोना झाला तर त्याला आणि त्याच्या संपूर्ण घराला वाळीत टाकण्याचा प्रकार पण बघण्यात आला. सरकारने यावर अश्या व्यक्तींना विलग ( quarantine )करायला सांगितले आहे ना की वाळीत टाकायला. याच भीतीने लोक स्वतःहून समोर यायला घाबरतात.

3. हिणवणे

एखाद्याला हा आजार झाला तर त्यांना वाळीत तर टाकलेच जाते पण त्यानंतर लोक काय म्हणतील ? हा एक प्रश्न आहेच, काही जणांच्या चेष्टेचा विषय तर होणार नाही ना आपण ही एक मानसिकता आहे त्यामुळे लोक स्वतःहून समोर यायला घाबरतात, घरगुती उपाय करतात आणि आजार बळावला की मग जीवावर बेतते.

आज सरकारचा एक स्तुत्य निर्णय वाचण्यात आला की अश्या प्रकारे कोणतीही वागणूक जर लोकांना देण्यात आली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि 100 पेक्षा जास्त सोसायटी ना आज नोटस ही देण्यात आली आहे.

कारण, काल HIV आज कोरोना; आजार हे येतात जातात पण मानसिकता?

शेवटी काय तर लोकांनी मानसिकता बदलली आणि लोकांप्रती सहानुभूती दाखवली तर हा लढा थोडासा सोयीस्कर होईल, जगात कोठेही नसलेली ही समस्या आपल्याच येथे आहे. या योध्याना, रुग्णांना बाहेरच्या देशात सन्मानाची वागणूक दिली जाते तशी आपल्या येथे पण दिली जावी एवढीच अपेक्षा.

घरी राहा, सुरक्षित राहा.

वैद्य. शिवकृष्ण विलास दिवटे
चिंचवड
7304560220

अक्षय्य म्हणजे अनंत... अक्षय्य म्हणजे अविनाशी...अक्षय्य म्हणजे ज्याचा क्षय होणार नाही असे... आयुर्वेदात सांगितलेल्या औषध...
26/04/2020

अक्षय्य म्हणजे अनंत...
अक्षय्य म्हणजे अविनाशी...
अक्षय्य म्हणजे ज्याचा क्षय होणार नाही असे...

आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.

साईवेद मल्टिस्पेशालिटी आयुर्वेदीक क्लीनिक(अक्षय्य आयुर्वेद) कडून तुम्हांला निरोगी आरोग्य आणि अक्षय्य आयुष्याच्या हार्दीक शुभेच्छा!!

घरी रहा. सुरक्षित रहा.

डॉ. शिवकृष्ण वि. दिवटे
साईवेद मल्टिस्पेशालिटी आयुर्वेदिक क्लिनिक (अक्षय्य आयुर्वेद), चिंचवड.
7304560220

*कोरोना फोबिया आणि तुम्ही.*काल मला "तातडीने तुम्हाला भेटायचे आहे" म्हणून कॉल आला, दिलेल्या वेळेत क्लिनिकला पेशंट आले. सग...
24/04/2020

*कोरोना फोबिया आणि तुम्ही.*

काल मला "तातडीने तुम्हाला भेटायचे आहे" म्हणून कॉल आला, दिलेल्या वेळेत क्लिनिकला पेशंट आले. सगळी तपासणी करून लक्षणे विचारून झाल्यावर काही विशेष म्हणावे, असे आढळले नाही, त्यावर त्यांचे उत्तर आले "मला कोरोना झाला असेल बहुतेक कारण मला रोज काही नाही काही लक्षणे जाणवतात, शरीराचे टेंपरेचर पण न चुकता तपासतो, ते मात्र वाढलेले नसते, पण सतत ताप आल्यासारखे जाणवते. कधीकधी घसा खवखवतो असे वाटते आणि काहीवेळा श्वास घ्यायला त्रास होतो असेही वाटते, पण तो थकवा म्हणून मी दुर्लक्ष करतो."

त्यांना थोडा सल्ला देऊन, मेडिटेशन, प्राणायाम आणि बाकी काही गोष्टी करायला सांगून 1 गोळी दिली. आज सकाळी त्यांचा कॉल आला की आता ओके वाटतेय आणि काही त्रास सुद्धा नाही, मग त्यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल व्यवस्थित माहिती दिली, की ते पूर्ण बरे आहेत आणि फक्त आजाराचे दडपण/टेंशन म्हणून तसे वाटत होते.
यालाच वैद्यकीय भाषेत Psychosomatic Symptoms म्हणतात.

*Psychosomatic Symptoms म्हणजे काय ???*

आपण काही गोष्टींचे, आजारांचे एवढे दडपण/टेंशन घेतलेले असते की, शरीरात त्या आजाराची लक्षणे दिसून येतात अथवा त्या व्यक्तीला तसे वाटत राहते, किंवा त्या आजाराची लक्षणे असल्याचा भास होणे, असे देखील म्हणता येईल. काही रुग्णांमध्ये खरंच लक्षणे दिसून येतात पण ज्याचे निदान नाही कारत येत करण सर्व टेस्ट negative येतात.

रोज किमान 5-6 कॉल येतात ज्यात "आम्हाला कोरोना झाला आहे बहुतेक" किंवा "मला एवढी लक्षणे आहेत, मग कोरोना झाला नसेल ना?" किंवा "मला कोरोना होईल असे वाटतेय" अश्या आशयाचे संभाषण असते.

यावर उपाय म्हणून शासनाने दिलेल्या सुचना पाळा, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपाय आणि ध्यान करा, व्यायाम करा एवढे सल्ले आम्ही देतो आणि खूपच त्रास वाटत असेल तर जवळच्या वैद्याला किंवा डॉक्टरांना भेटा असे सांगतो.

*कोरोनाकडे दुर्लक्ष करू नका आणि घाबरून जाऊ नका, सकारात्मक रहा. वारंवार बातम्या बघणे आणि आकडेवारी बघणे टाळा. मन चांगल्या कामात, वाचनात गुंतवा. आता तुम्ही फक्त शारीरिक आणि मानसिक स्वास्थाकडे लक्ष देऊ शकता, तेच करा.*

*घरी रहा.सुरक्षित रहा.*

*वैद्य. शिवकृष्ण विलास दिवटे.*
*साईवेद मल्टिस्पेशालिटी आयुर्वेदिक क्लिनिक, चिंचवड.*
*7304560220*

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता साईवेद मल्टिस्पेशालिटी आयुर्वेदीक क्लीनिक (अक्षय्य आयुर्वेद) तर्फे आम्ही सशुल्क ऑनलाईन क...
22/04/2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता साईवेद मल्टिस्पेशालिटी आयुर्वेदीक क्लीनिक (अक्षय्य आयुर्वेद) तर्फे आम्ही सशुल्क ऑनलाईन कॉल/whtsapp /विडीओ कॉलच्या माध्यमातून कन्सलटेशन चालू केलं आहे. त्यात बरेच कॉल येवू लागले. येणार्‍या कॉलमध्ये सर्दी खोकला असलेले पेशंट होते. पेशंटचा आहार विचारात घेता एक गोष्ट लक्षात आली. वाढत्या तापमानामुळे जेवणात वाढलेला दही, ताक, लस्सीचा अतिप्रमाणात वापर.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर लोकांना Ac वापरू नका, शीतपेय घेऊ नका असे संगीतले जाते आणि हे पाळायचे म्हणून लोक आपल्या पारंपरिक पेयांकडे वळताना दिसतात, आणि मग लस्सी, ताक, दही याचा समावेश जेवणात करताना दिसतात, सध्या ग्रीष्म ऋतू चालू असल्याने उन्हाच्या तडाख्यापासून वाचायला ही पेये सहज उपलब्ध पण होतात.
यासंदर्भात एक घ्यायची काळजी म्हणजे ही पेये उन्हाळ्यामध्ये घ्यायची नसतात, तुम्ही म्हणाल या गोष्टी तर थंड असतात आणि उन्हाळ्यात का नाही घ्यायच्या? फक्त बर्फ घातला किंवा फ्रीज मध्ये ठेवले म्हणून हे पदार्थ थंड होत नाहीत, तर शरीरावर होणाऱ्या त्यांच्या परिणामामुळे ठरत असते. दही, ताक आणि त्यापासून बनणारे छाछ, लस्सी असे पदार्थ सुद्धा शरीरामध्ये उष्णता वाढवतात.

हे पदार्थ उष्णतेचा त्रास असणार्यानी, शौचा वेळी रक्त पडणे किंवा मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्राव, डोकेदुखी , अशक्त, ज्यांना चक्कर येते असे लोक , जखमी( शस्त्रक्रीया झालेले किंवा अन्य) अश्या लोकांनी घेऊ नये.

दही नियमित खाणाऱ्या एक डोकेदुखी (Migraine) च्या रुग्णाला दही बंद केल्यानंतर मिळालेला उपशय(आराम) आणि रोगमुक्ती सुद्धा मला अनुभवायला मिळाली आहे.

त्यामुळे थंड लागते म्हणून दही ताक शक्यतो या ग्रीष्म ऋतू (उन्हाळा)मध्ये घेऊ नये.

डॉ. शिवकृष्ण दिवटे.
साईवेद मल्टिस्पेशालिटी आयुर्वेदिक क्लिनिक (अक्षय्य आयुर्वेद), चिंचवड.
7304560220

22/04/2020
21/04/2020



*आयुर्वेदीक फीजीशियन.*

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये *डॉ.शिवकृष्ण दिवटेंच्या साईवेद मल्टिस्पेशालिटी आयुर्वेदीक क्लीनिक (अक्षय्य आयुर्वेद)* तर्फे ऑनलाईन/व्हॉट्सअपच्या माध्यमातून *सशुल्क* कन्सल्टन्सी सुरु करत आहोत. गरज पडल्यास ज्येष्ठ नागरिकांसाठी होम विजीट दिली जाईल.

MCIM च्या निर्देशानुसार व्याधींवर योग्य औषधे आणि मात्रा(डोस) दिला जाईल.

पेशंट *7304560220* या नंबरवर डॉक्टरांशी डायरेक्ट संपर्क साधू शकता.

*Stay home. Stay safe!!*

पुढील सुचनेपर्यंत
*डॉ. शिवकृष्ण दिवटे यांच्याशी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० व सायंकाळी ५.०० ते ७.०० ऑनलाईन कींवा फोनवर संपर्क साधू शकता.*

कॉल करण्याआधी तुमचे नांव, वय आणि आरोग्य विषयक तक्रार मेसेज करावी आणि त्यानंतर जरुरुततेनुसार आँडीयो विडीयो कॉलसाठी अँपॉईंटमेंट दिली जाईल.

*Stay home. Stay safe.*

पुष्य या शब्दातच पोषण लपलेले आहे. या नक्षत्रावर केलेल्या सर्व शुभ कर्मास फलप्राप्ती होते. आयुर्वेदातही पुष्य नक्षत्रास व...
04/02/2020

पुष्य या शब्दातच पोषण लपलेले आहे. या नक्षत्रावर केलेल्या सर्व शुभ कर्मास फलप्राप्ती होते. आयुर्वेदातही पुष्य नक्षत्रास विशेष महत्त्व दिले गेले आहे. 'सुवर्ण प्राशन संस्कार' पुष्य नक्षत्र योगावर बालकास दिल्यास बालकाचा सर्वांगीण विकास तसेच बौद्धिक प्रगती होतेच असे आयुर्वेद सांगते. मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी सुवर्ण प्राशन नक्कीच लाभदायक ठरते.

साईवेद आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म केंद्रात सुवर्ण प्राशनमध्ये सुवर्ण भस्म हे योग्य प्रमाणात टाकून शास्त्रोक्त पद्धतीने मंत्राच्या गजरात तज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली मार्गदर्शनाखाली बनवले जाते.

सुवर्ण प्राशन कमीत कमी जन्मापासून सहा महिन्यापर्यंत रोज द्यावे. नंतर दर पुष्य नक्षत्राला द्यावे. *सुवर्ण प्राशन* हे महिन्यांतून एकदा पुष्य नक्षत्राचे दिवशी दिले जाते. तसेच रोजही थोड्या प्रमाणात ते देता येऊ शकते. पण त्याची मात्रा ही वयानुसार बदलते. त्यामुळे वैद्यांना विचारुनच घेतल्याशिवाय ती मात्रा ठरवणे अयोग्य ठरु शकते.

*येत्या 8 फेब्रुवारीला पुष्य नक्षत्र आहे. आपल्या बालकासाठी आजच बुकिंग करा. नांव नोंदणी आवश्यक आहे.*

*अधिक माहितीसाठी आणि नांव नोंदणीसाठी संपर्क*
*डॉ. शिवकृष्ण दिवटे.*
*साईवेद आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म केंद्र, चिंचवड.*
*7304560220*

मुलीचे वय 17 वर्षे पण वयानुसार कमी असलेली उंची हे तिच्या आईचे टेंशन होते. त्यासाठी सल्ला घ्यायला मायलेकी दवाखान्यात आल्य...
06/01/2020

मुलीचे वय 17 वर्षे पण वयानुसार कमी असलेली उंची हे तिच्या आईचे टेंशन होते. त्यासाठी सल्ला घ्यायला मायलेकी दवाखान्यात आल्या. हल्लीच्या स्पर्धेच्या युगात उंची हा एक महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. मुलीशी आणि आईशी थोडी चर्चा मसलत केली. काही आहार बदल, व्यायाम, योगासने, सूर्य नमस्कार ईत्यादि गोष्टी बरोबर आयुर्वेदिक औषधे दिली. सुचवलेल्या ट्रीटमेंट नियमितपणे केल्यामुळे आणि आयुर्वेदिक औषधांच्या मदतीमुळे 60 दिवसात उंची तब्बल ३ इंच वाढली.

योग्य संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने आणि सूर्य नमस्कार यांच्या साहाय्याने आयुर्वेदात उंची वाढीला नक्कीच उत्तर आहे.

योग्य खा. निरोगी रहा.

वैद्य. शिवकृष्ण दिवटे.
साईवेद आयुर्वेदिक क्लिनिक,
चिंचवड.
7304560220

( 'उंची वाढविणे shibir' दर आठवड्याला शनिवारी सकाळी १० ते १ आणि सायंकाळी ६ ते ९ चिंचवड क्लिनिक येथे असते. येण्याआधी फोनवर नाव नोंदणी आवश्यक)

हाताला 15 वर्ष सोरायसिस आहे. पेशंटचे वय 23 वर्ष. चंद्रपूर मधल्या नामांकित डॉक्टरकडे allopathic उपचार चालू आहेत, पण काहीच...
26/12/2019

हाताला 15 वर्ष सोरायसिस आहे. पेशंटचे वय 23 वर्ष. चंद्रपूर मधल्या नामांकित डॉक्टरकडे allopathic उपचार चालू आहेत, पण काहीच फरक नाही. मधल्या काळात होमिओपॅथी औषध पण घेतली पण औषधाने काही वेळेपूरता फरक पडतो आणि पुन्हा त्रास सुरू होतो. त्रासामुळे मानसिक अवस्थासुद्धा ठीक नाही. चंद्रपूरला जायला वेळ नाही आणि परीक्षा तोंडावर आहे, म्हणून एका मैत्रिणीच्या रेफरंसमुळे आणि तिला मिळालेल्या चांगल्या रिझल्टमुळे लास्ट ट्राय म्हणुन आयुर्वेदिक उपचार करायचे आहेत. एवढी माहिती फोन वरच्या संभाषणात समजली. पेशंटला क्लिनिकला येऊन भेटा सांगितलं.

हात पाहिल्यावर हे सोरायसिस नाही तर चुकीचा आहार आणि उष्णतेच्या त्रासामुळे होणारा त्रास आहे हे समजलं. काही पथ्य, आयुर्वेदिक औषधं आणि योग्य आहार घेऊन आठच दिवसात त्रास 80% गेला.

चुकीचे मार्गदर्शन, चुकीचा आहार, चुकीचे उपचार याला आयुर्वेदात नक्कीच उत्तर आहे.

योग्य खा. निरोगी राहा.

वैद्य. शिवकृष्ण दिवटे.
साईवेद आयुर्वेदिक क्लिनिक,
चिंचवड.
7304560220

साईवेद आयुर्वेद परिवारातर्फे सर्वांना धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..दिवाळी सर्वांना आरोग्यमयी आणि आनंदी जा...
25/10/2019

साईवेद आयुर्वेद परिवारातर्फे सर्वांना धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
दिवाळी सर्वांना आरोग्यमयी आणि आनंदी जाओ हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना...💐💐💐💐

Address

Purna Nagar
Chinchwad
411019

Telephone

7304560220

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshayya Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Akshayya Ayurved:

Share

Category