07/06/2026
जगभरात सध्या युद्धाचे ढग असले तरीही नेपाळ आणि भारत यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध असावेत अशी आशा नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी व्यक्त केली. "नेपाळला भारतासोबतचा सीमावाद संवाद आणि राजकीय मार्गाने सोडवायचा आहे. नेपाळचे सध्याचे सरकार भारताकडे २१ व्या शतकातील राजकारण आणि जागतिक सत्तासंघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. जर दोन्ही देशांनी एकत्र बसून मोकळ्या मनाने चर्चा केली, तर कोणतीही समस्या सोडवता येईल. कारण कोणतीही समस्या इतकी मोठी नसते की चर्चेने सोडवता येत नाही. नेपाळला भारतासोबत असे संबंध हवे आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांचा विकास होईल आणि फायदा होईल," असे खनाल म्हणाले. रविवारी ते नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.