29/11/2022
मणी व मल्ल या दानवांच्या त्रासातून जनतेला मुक्त करण्यासाठी भगवान शंकराने खंडोबाचे म्हणजेच मार्तंड भैरवाचे रूप घेऊन मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून शुक्ल षष्ठीपर्यंत म्हणजे तब्बल 6 दिवस युद्ध केले.
मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याचा वध केला. त्यावेळी मणी राक्षसाने शरण येऊन 'माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे अश्वारूढ रूप तुझ्या शेजारी राहू दे', अशी ईच्छा मार्तंड भैरवाकडे व्यक्त केली. ती मान्य देखील झाली. तर मल्ल राक्षस शरण आला आणि त्यानेही मार्तंड भैरवाकडे वर मागितला. माझे नाव तुमच्या नावाआधी जोडले जावे, अशी मागणी केली. त्यानंतर मार्तंडाने मल्ल राक्षसास आशिर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांना मल्हारी मार्तंड, असे म्हटले जाऊ लागले.
तेव्हापासून मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला भगवान शंकराची व मल्हारी मार्तंडाची पूजा केली जाते. तर आपणावर व आपल्या कुटुंबीयावर मल्हारी मार्तंडाची कृपा सदोदित राहो आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व दुःखरुपी राक्षसांचा संहार करून परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने आपले आयुष्य सुख, समृद्धी, धनधान्य, आरोग्य, दीर्घायुष्य यांनी भरून जावो ही शुभेच्छा!
चंपाषष्ठीच्या मंगलमय शुभेच्छा!
#चंपाषष्ठी