26/07/2026
*Food Cravings Part 2*
*संतुलित-असंतुलित आहार*
आपल्या जेवणात कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि इतर घटक यांचे प्रमाण योग्य असले की आपण त्यास संतुलित आहार म्हणतो.
परंतू आयुर्वेदात संतुलित आहार म्हणजे काय सांगितले आहे??
तर रोजच्या जेवणात ६ रसांच्या पदार्थांचा समावेश असणे आणि ते योग्य क्रमाने सेवन करणे म्हणजे संतुलित आहार होय.
खर तर स्वीट डिश शेवट खाण्याची पद्धत आयुर्वेदाला मान्य नाही. जेवणाची सुरुवात स्वादू म्हणजे गोड पदार्थाने करायला हवी त्या नंतर आंबट पदार्थ जसे की काही ताज्या चटण्यांचे प्रकार किवा कोशिंबिरी यांचे सेवन मग लवण रस जसे की पापड, लोणचे त्यानंतर तिखट पदार्थ जसे की आमटी, भाजी त्या नंतर कडू रस आणि शेवट हा कषाय रसाने ताकासारखे पदार्थ सेवन करून करावा असे सांगितले आहे . अर्थातच या सर्वांना ऋतुसापेक्ष बदल देखील करावे लागतात.
आता मधुर रस म्हणजे केवळ चवीला गोड एवढाच सीमित अर्थ नसून जे जे पदार्थ पचन प्रक्रिये दरम्यान मधुरता उत्पन्न करतात असे सर्व जसे की गव्हाची पोळी, भात देखील याकरिता च पंगत सुरू करताना भात प्रथम वाढायची पद्धत पूर्वीपासून आहे .
त्यात देखील स्थूल व्यक्ती, मधुमेही व्यक्ती यांना भात खायचा झालाच तर तो तांदूळ प्रथम हलका भाजून घेऊन मग शिजवावा आणि वापरला जाणारा तांदूळ हा जुना असावा किमान ६ महिने ते १ वर्ष, असे सांगितले आहे.
क्रमशः
डॉ. क्षितिजा कुलकर्णी
७८८८०५१६११
आहार सेवनाचे अन्य माहिती आणि नियम वाचण्यासाठी ⬇️
https://chat.whatsapp.com/L7LrfWJaYDKDotPgewxReO?s=cl&p=i&mlu=1