Vedacare Ayurved & Panchakarma Clinic

Vedacare Ayurved & Panchakarma Clinic Experience the power of healing at Vedacare Pune. Your trusted clinic for Ayurvedic consultations and Panchakarma treatments.

We treat the root cause, not just the symptoms
🍃 100% Ayurved | Expert Vaidya | Personalized Care
👇 Book your appointment today

12/07/2026

बस्ती म्हणजे फक्त 'एनिमा' नव्हे!
डॉक्टर, बस्ती म्हणजे तो पोट साफ करायचा 'एनिमा' (E***a) ना? पण मला तर बद्धकोष्ठतेचा (Constipation) काहीच त्रास नाहीये, माझं पोट रोज अगदी व्यवस्थित साफ होतं. मग मी माझ्या सांधेदुखीसाठी आणि कंबरदुखीसाठी एनिमा का घेऊ?

मी एखाद्या रुग्णाला वातविकारासाठी किंवा सांधेदुखीसाठी 'बस्ती चिकित्सा' करण्याचा सल्ला देतो, तेव्हा ९०% रुग्णांची हीच प्रतिक्रिया असते. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रभावामुळे आपला असा ठाम समज झाला आहे की, गुदमार्गावाटे दिला जाणारा कोणताही द्रव पदार्थ म्हणजे केवळ 'पोट साफ करण्याचा उपाय' आहे.

पण एक आयुर्वेदिक वैद्य म्हणून मला हे अत्यंत ठामपणे सांगावेसे वाटते की बस्तीला फक्त 'एनिमा' समजणे, हा आयुर्वेदाचा केलेला सर्वात मोठा अपमान आहे!

एनिमा याचा एकमेव उद्देश असतो मोठ्या आतड्यात अडकलेला मल बाहेर काढणे. यासाठी साधारणतः साबणाचे पाणी किंवा ग्लिसरीन वापरले जाते. जसं बेसिनची पाईपलाईन चोक झाल्यावर आपण पाण्याचा फोर्स मारून कचरा बाहेर काढतो, तसाच हा प्रकार आहे.

यात शरीराला कोणतेही 'पोषण' मिळत नाहीबस्तीचा मुख्य उद्देश फक्त मल बाहेर काढणे हा नसून, संपूर्ण शरीरातील वाढलेल्या 'वात दोषाला' मुळासकट नष्ट करणे हा आहे. यासाठी साधे पाणी वापरले जात नाही, तर आजारानुसार अत्यंत काळजीपूर्वक बनवलेले औषधी वनस्पतींचे काढे (निरूह बस्ती) आणि औषधी सिद्ध तेले/तूप (अनुवासन बस्ती) वापरले जातात.

समजा, एका झाडाची पाने सुकायला लागली आहेत. तुम्ही वरून पानांवर कितीही पाणी शिंपडले, तरी ते झाड पुन्हा टवटवीत होणार नाही. पण जर तुम्ही त्या झाडाच्या 'मुळाशी' खत आणि पाणी घातले, तर ते पाणी शोषले जाऊन थेट शेंड्यापर्यंत पोहोचते आणि संपूर्ण झाड पुन्हा हिरवेगार होते.

अगदी याचप्रमाणे, आपल्या शरीरातील वातदोषाचे मुख्य केंद्र (मूळ स्थान) हे 'पक्वाशय' (मोठे आतडे) आहे. जेव्हा गुडघेदुखी, सायटिका, किंवा मणक्याचे आजार होतात, तेव्हा आम्ही वेदनाशामक गोळ्या देऊन पानांवर पाणी शिंपडत नाही; तर गुदमार्गाद्वारे औषधी तेल थेट 'मुळाशी' (मोठ्या आतड्यात) देतो.

मोठ्या आतड्याची आतली त्वचा (Mucosa) अत्यंत सच्छिद्र असते आणि तिथे रक्तवाहिन्यांचे मोठे जाळे असते. जेव्हा बस्तीद्वारे औषधी तेल किंवा काढा आतड्यात जातो, तेव्हा तो मल बाहेर काढून थांबत नाही; तर ते औषधी घटक आतड्याच्या भिंतींमधून रक्तात शोषले जातात (Enteric Absorption).

रक्तात शोषले गेलेले हे औषधी घटक थेट हाडांपर्यंत, मज्जासंस्थेपर्यंत (Nervous system) आणि कोरड्या पडलेल्या सांध्यांपर्यंत पोहोचतात. ते सांध्यांना आतून 'वंगण' (Lubrication) देतात, हाडांची झीज भरून काढतात आणि वात पूर्णपणे शांत करतात.

बस्ती ही 'अर्धचिकित्सा' आहे! आयुर्वेदात बस्तीला केवळ एक उपचार न मानता अर्धचिकित्सा असा सर्वोच्च दर्जा दिला आहे. एनिमा फक्त बद्धकोष्ठता दूर करतो, पण बस्ती ही पीसीओडी (PCOD), वंध्यत्व (Infertility), मणक्याचे आजार, अर्धांगवायू (Paralysis) आणि मानसिक आजारांवरही संजीवनीसारखी काम करते.

बस्ती आणि एनिमा या दोन्ही गोष्टी एकाच मार्गाने दिल्या जात असल्या, तरी दोघांची काम करण्याची पद्धत, औषधे आणि परिणाम यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. एनिमा ही तात्पुरती 'सफाई' आहे, तर बस्ती ही शरीराला मुळापासून निरोगी करणारी, नसांना बळकटी देणारी आणि आजारांना मुळासकट उपटून काढणारी एक अत्यंत प्रगत 'सिस्टीमिक थेरपी' आहे.

त्यामुळे यापुढे बस्तीला 'एनिमा' म्हणण्याची चूक करू नका; ती तुमच्या शरीराची खऱ्या अर्थाने केलेली सर्वोत्तम 'सर्व्हिसिंग' आहे!

डॉ. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद, पुणे.

11/07/2026

एकदा औषध घेऊन बरा झालो, की पुन्हा कधीच आजारी पडणार नाही ना?

ओपीडीत जेव्हा एखाद्या रुग्णाला आयुर्वेदिक उपचारांनी पूर्ण गुण येतो, तेव्हा जाता जाता हसत हसत ते एक प्रश्न नक्की विचारतात "डॉक्टर, आता मी पूर्ण बरा झालोय. आता पुढे कधीच मला हा त्रास पुन्हा होणार नाही ना?"

हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. आपण सगळेच एका 'परमनंट सोल्यूशन'च्या शोधात असतो. पण जेव्हा रुग्ण मला हा प्रश्न विचारतात, तेव्हा मी त्यांना हसून एक प्रतिप्रश्न विचारतो.

"तुम्ही गाडीची एकदा सर्व्हिसिंग केली, की ती आयुष्यभर पुन्हा कधीच बिघडणार नाही, याची गॅरंटी गॅरेजवाला देतो का? किंवा... आज तुम्ही अंघोळ केली, तर उद्या पुन्हा अंघोळ करण्याची गरज पडणार नाही का?"
यावर रुग्ण हसतात, पण त्यांना माझ्या प्रश्नामागचा अर्थ लगेच समजतो.

आरोग्य ही 'फिक्स्ड डिपॉझिट' नाही! आपला असा एक मोठा गैरसमज असतो की आरोग्य म्हणजे बँकेतली 'फिक्स्ड डिपॉझिट' आहे; एकदा औषध घेऊन ती केली, की आयुष्यभर नुसतं व्याज खात राहायचं! पण प्रत्यक्षात, आरोग्य ही एक 'रोज' चालणारी प्रक्रिया आहे (Continuous Process).

आयुर्वेदाचे मुख्य उद्दिष्ट केवळ आजार बरा करणे हे नाही, तर 'स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं' म्हणजे निरोगी माणसाचे आरोग्य टिकवून ठेवणे हे आहे.

मग औषध नेमकं काय करतं? जेव्हा तुम्ही आजारी पडता, तेव्हा तुम्ही एका खोल खड्ड्यात पडलेले असता. आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्म हे तुम्हाला त्या खड्ड्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं, शरीरातील विषारी घटक (आम) साफ करण्याचं आणि तुमचा विझलेला 'अग्नी' पुन्हा प्रज्वलित करण्याचं काम करतात.

पण... खड्ड्यातून बाहेर आल्यावर, पुन्हा डोळे झाकून त्याच रस्त्यावरून चालायचं की खड्डे चुकवून चालायचं, ही जबाबदारी तुमची असते!

आजार परत का येतो? जर उपचारांनंतर तुम्ही पुन्हा तीच जुनी चुकीची जीवनशैली सुरू केली
• रात्री उशिरापर्यंत जागरण करणे
• वेळेवर न जेवणे आणि जंक फूड खाणे
• पावसाळ्यासारख्या ऋतूतही पचायला जड असलेले अन्न खाणे
• सतत मानसिक ताणतणाव घेणे..
तर शरीर तुम्हाला पुन्हा 'इशारे' देणारच! आजार परत येणे हे औषधाचे किंवा डॉक्टरचे अपयश नसते, तर ते आपण पुन्हा मोडलेल्या 'निसर्गाच्या नियमांचे' फळ असते.

थोडक्यात सांगायचं तर... औषध तुम्हाला आजारातून बाहेर काढतं, पण तुमची 'जीवनशैली आणि आहार' (दिनचर्या आणि ऋतुचर्या) तुम्हाला कायम निरोगी ठेवते. निसर्गाच्या घड्याळासोबत चालायला शिका, तुमच्या पोटातील अग्नीचा आदर करा. मग बघा, तुम्हाला
वारंवार डॉक्टरांच्या किंवा औषधांच्या कुबड्या घेण्याची गरजच पडणार नाही!
तुमचे आरोग्य तुमच्याच हातात आहे. निरोगी राहा, आनंदी राहा!

डॉ. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद, पुणे.

10/07/2026

थायरॉईडची गोळी खाऊनही फरक का पडत नाही?
सकाळची वेळ होती. ओपीडीमध्ये एक चाळीस वर्षांच्या महिला रुग्ण आल्या. त्यांच्या हातात रक्ताच्या तपासणीचे एकदम 'नॉर्मल' आलेले रिपोर्ट्स होते. त्या गेल्या तीन-चार वर्षांपासून रोज सकाळी न चुकता ५० मायक्रोग्रॅम थायरॉईडची गोळी घेत होत्या.
माझ्यासमोर बसताच त्या अत्यंत निराश होऊन म्हणाल्या, "डॉक्टर, माझा TSH रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे, गोळी पण रोज न चुकता घेतेय... तरीही मला काहीच फरक पडत नाहीये! वजन वाढतंच चाललंय, गळणारे केस थांबत नाहीत, चेहऱ्यावर सूज असते आणि सकाळी उठलं की प्रचंड थकवा असतो. रिपोर्ट नॉर्मल असूनही मी आजारी का आहे?" हा प्रश्न आजकाल थायरॉईडच्या गोळ्या घेणाऱ्या लाखो रुग्णांच्या मनातला एक प्रश्न आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्र थायरॉईडकडे फक्त 'हार्मोनची कमतरता' म्हणून बघते. बाहेरून गोळी दिली की रक्तात हार्मोनची पातळी वाढते आणि रिपोर्ट 'नॉर्मल' येतो. पण हजारो वर्षांपूर्वी महर्षी चरक आणि वाग्भटांनी अशा आजारांचे मूळ शोधताना 'धात्वाग्नी' ही संकल्पना मांडली होती. जेव्हा शरीरातील पचनशक्ती आणि पेशींच्या स्तरावर असलेला हा 'धात्वाग्नी' मंदावतो, तेव्हा 'कफ' आणि 'वात' दोष वाढून शरीराच्या Metabolism क्रियेत अडथळा निर्माण होतो.

गोळी फक्त रक्तातील हार्मोनची कमतरता भरून काढते, पण पेशींमधला मंदावलेला 'अग्नी' ती गोळी प्रज्वलित करू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर गाडीच्या टाकीत पेट्रोल (हार्मोन) तर पूर्ण भरलंय, पण इंजिनच (अग्नी) खराब असेल तर गाडी कशी धावणार? इथेच आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित होते.

वेदाकेअर'मध्ये आम्ही फक्त रक्ताचे रिपोर्ट्स बघत नाही. नाडी परीक्षेतून मला स्पष्ट जाणवले की त्यांच्या शरीरात 'आम' (न पचलेला विषारी अंश) साचला होता आणि त्यांच्या पेशींचे पोषण थांबले होते (स्रोतोरोध).
आम्ही त्यांना केवळ 'रिपोर्ट्स' नॉर्मल करण्यासाठी नाही, तर शरीराचे बिघडलेले 'इंजिन' सुधारण्यासाठी उपचार दिले. आयुर्वेदिक औषध, पंचकर्मातील 'नस्य' आणि आहाराचे काही कडक नियम सुरू केले.

अवघ्या तीन ते चार महिन्यांतच एक आश्चर्यकारक बदल दिसला! त्यांचा तो जुनाट थकवा पूर्णपणे गायब झाला, चेहऱ्यावरील सूज उतरली, वजन आटोक्यात येऊ लागले आणि शरीरात एक नवी ऊर्जा निर्माण झाली. आता त्यांचे केवळ रिपोर्ट्सच नॉर्मल नव्हते, तर त्या खऱ्या अर्थाने 'आतून' निरोगी झाल्या होत्या.
आपले शरीर हे एखादे रिकामे भांडे नाही की ज्यात एखादे केमिकल कमी पडले म्हणून ते वरून ओतले आणि काम झाले! शरीर हे एक जिवंत निसर्गचक्र आहे.

केवळ कागदावरील रिपोर्ट्समधील आकडे नॉर्मल करणे म्हणजे आरोग्य नव्हे. शरीराचा अग्नी आणि चयापचय मुळापासून सुधारणे हेच खरे स्वास्थ्य. जे शरीर निसर्गापासून आणि स्वतःच्या गतीपासून दुरावले आहे, त्याला पुन्हा नैसर्गिक लयीत आणणे... हेच तर आयुर्वेदाचे खरे उद्दिष्ट आहे!

डॉ. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
पुणे.
9028191155

09/07/2026

सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तरी दिवसभर गळून गेल्यासारखं का वाटतंय? 'या' छुप्या कारणाकडे दुर्लक्ष करू नका!

डॉक्टर, मला नेमकं काय झालंय तेच समजत नाहीये... सकाळी उठल्यापासून अंगात त्राणच नसतो. रात्री ८-१० तास भरपूर झोप घेतो, तरी सकाळी डोळे उघडत नाहीत. ऑफिसला जाताना असं वाटतं की अंगावर कोणीतरी मणभर वजन ठेवलंय. दुपारी जेवण झालं की कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे बघताना डोळ्यांवर प्रचंड झापड येते. पूर्वी मी मित्रांसोबत ट्रेकिंगला जायचो, वीकेंडला फिरायचो, पण आता साधी घराची पायरी चढली तरी जीव दमून जातो. सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी सीबीसी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-१२, थायरॉईड आणि अगदी डायबेटिसचे सगळे रिपोर्ट करून घेतले. सगळे रिपोर्ट अगदी 'नॉर्मल' आहेत! मग तरीही माझं शरीर असं साथ का सोडतंय? मी खोटं बोलतोय असं घरातल्यांना वाटायला लागलंय, पण माझा जीव मलाच माहिती आहे...

३६ वर्षांचे सागर जेव्हा आमच्या क्लिनिकमध्ये आले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात प्रचंड हताशपणा आणि थकवा स्पष्ट दिसत होता. सागर एका नामांकित आयटी (IT) कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. चांगला पगार, सुखी कुटुंब, सर्व काही सुरळीत असताना गेल्या दीड वर्षांत त्यांच्या आयुष्याला या 'सततच्या थकव्याने' ग्रासले होते. कामावर लक्ष केंद्रित न होणे, चिडचिड होणे आणि घरी आल्यावर सोफ्यावरून उठायचीही इच्छा न होणे, यामुळे त्यांचे कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्य कोलमडण्याच्या मार्गावर होते. जेव्हा त्यांनी त्यांचे शेकडो नॉर्मल रिपोर्ट माझ्यासमोर ठेवले, तेव्हा मी त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली, सागर, तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत कारण ते रक्तातील घटकांची पातळी दाखवतात, पण तुमच्या शरीराची 'पचनशक्ती' आणि 'ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता' आतून किती खालावली आहे, हे कोणत्याही लॅब रिपोर्टमध्ये येत नाही. तुमचे शरीर आजारी नाही, तर ते आतून पूर्णपणे थकले आहे.

बहुतांश लोक जेव्हा सतत थकवा जाणवतो, तेव्हा त्याला 'कामाचा ताण' किंवा 'झोप पूर्ण न होणे' असं म्हणून दुर्लक्ष करतात. सुरुवातीला चहा-कॉफीचे प्रमाण वाढवून, एनर्जी ड्रिंक्स पिऊन किंवा स्वतःच्या मनानेच मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाऊन हा थकवा दाबण्याचा प्रयत्न केला जातो. लॅब रिपोर्ट नॉर्मल आले की माणसाचा स्वतःच्या शरीरावरील विश्वास उडू लागतो आणि त्याला वाटायला लागतं की हा कदाचित मानसिक त्रास असावा.

परंतु, हा थकवा इतका सुप्त आणि संथ असतो की तो शरीरात हळूहळू आपली पाळंमुळं रोवतो. जेव्हा शरीरातील दोष बिघडतात, तेव्हा ते सुरुवातीला रक्ताच्या रिपोर्टमध्ये बदल घडवून आणत नाहीत, तर ते पेशींच्या पातळीवर आणि स्त्रोतसामध्ये अडथळा निर्माण करतात. जर या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात हाच थकवा गंभीर नैराश्य, क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम , ऑटोइम्यून आजार, आणि शरीराची प्रतिकारश शक्ती पूर्णपणे नष्ट होणे अशा मोठ्या विकारांमध्ये रूपांतरित होऊ शकतो.

सततचा थकवा केवळ शरीराला थकवत नाही, तर तो तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला पोखरून काढतो. सकाळी उठल्यापासूनच ऊर्जा नसल्यामुळे रोजची कामं म्हणजे एक मोठी लढाई वाटते. ऑफिसमध्ये साध्या साध्या गोष्टींवरून चिडचिड होते, कामातील अचूकता कमी होते आणि कार्यक्षमता खालावल्यामुळे करिअरमध्ये मागे पडण्याची भीती सतावू लागते.

मोठा आजार निर्माण होण्यापूर्वी शरीर काही सुप्त लक्षणे दाखवून आपल्याला सावध करत असते. खालील ५ ते १० लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका:

रात्री ७-८ तास झोपूनही सकाळी उठल्यावर ताजेतवाने न वाटणे, अंग जड असणे.
भूक न लागणे किंवा जेवणाची वेळ झाली तरी पोट जड किंवा फुगलेले वाटणे.
जीभेवर पांढरा, चिकट थर साठणे आणि तोंडाला सतत कडवट किंवा बेचव चव असणे.
हातापायांच्या पिंढऱ्यांमध्ये सतत आंबल्यासारख्या वेदना होणे किंवा गोळे येणे.
थोडंही काम केलं किंवा चाललं की कंंबर आणि पाठीचा कणा दुखणे.
कामावर लक्ष केंद्रित न होणे, वारंवार गोष्टी विसरणे.
उत्साहाचा पूर्णपणे अभाव असणे आणि सतत पडून राहावेसे वाटणे.
हवामानात थोडा जरी बदल झाला तरी लगेच सर्दी, खोकला किंवा संसर्ग होणे.

हा थकवा कोणत्याही वयात होऊ शकत असला, तरी आजच्या काळात २५ ते ५० वर्षे वयोगटातील लोक याचे शिकार जास्त होत आहेत. विशेषतः:

आयटी प्रोफेशनल्स आणि डेस्क जॉब करणारे: जे सलग ८ ते १० तास एकाच ठिकाणी बसून संगणकासमोर काम करतात, ज्यांची शारीरिक हालचाल शून्य आहे.
शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी: ज्यांच्या कामाच्या वेळा सतत बदलतात आणि रात्रीची झोप नियमित नसते.
अतिप्रमाणात चहा, कॉफी किंवा जंक फूड घेणारे: जे भूक मारण्यासाठी किंवा तात्पुरता उत्साह मिळवण्यासाठी कॅफिन आणि मैद्याचे पदार्थ वारंवार खातात.
सतत मानसिक तणावाखाली असणारे: व्यावसायिक स्पर्धा, आर्थिक चिंता किंवा कौटुंबिक वाद यांमुळे ज्यांचे मन कधीही शांत नसते.
चुकीच्या पद्धतीचे डाएट करणारे: शरीराची प्रकृती न समजून घेता इंटरनेटवरील सल्ले पाहून उपाशी राहणारे किंवा क्रॅश डाएट करणारे.

वैद्यकशास्त्रानुसार आणि शरीराच्या रचनेनुसार, आपण जे अन्न खातो, त्याचे रूपांतर पेशींच्या पातळीवर ऊर्जेत होणे आवश्यक असते. हे काम पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया' नावाचे घटक करतात, ज्यांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हटले जाते.

जेव्हा आपण सतत मानसिक तणावाखाली असतो, तेव्हा शरीरात 'कॉर्टिसॉल' नावाचे स्ट्रेस हार्मोन अतिप्रमाणात स्रवू लागते. या वाढलेल्या कॉर्टिसॉलमुळे शरीराची पचनसंस्था मंदावते आणि चयापचय बिघडते. यामुळे अन्नाचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. परिणामी, पेशींना आवश्यक असणारे ग्लुकोज, ऑक्सिजन आणि इतर पोषणद्रव्ये मिळत नाहीत.

जसं एखाद्या वाहनाच्या इंजिनमध्ये खूप कचरा किंवा कार्बन साचला, तर आपण कितीही महागडं आणि चांगलं इंधन (पेट्रोल) टाकलं तरी गाडी गचके खात चालते आणि मायलेज देत नाही; तसंच जर तुमच्या शरीराच्या पेशींमध्ये टाकाऊ पदार्थ साचले, तर तुम्ही कितीही काजू, बदाम किंवा महागड्या मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाल्ल्या, तरी शरीर ती ऊर्जा शोषून घेऊ शकत नाही आणि शरीराचे इंजिन कायम थकलेले राहते.

जेव्हा एखादी व्यक्ती सतत चुकीचा आहार घेते (जसे की वेळेवर न जेवणे, शिळे अन्न खाणे, मैद्याचे व तळलेले पदार्थ खाणे) आणि सोबतीला मानसिक ताण व रात्रीचे जागरण करते, तेव्हा शरीरातील 'जठराग्नि' (पचनशक्ती) मंदावतो. मंद अग्नीमुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण आणि योग्य पचन होत नाही. या अपक्व अन्नापासून शरीरात एक चिकट, विषारी द्रव तयार होतो, ज्याला आयुर्वेदात 'आम' म्हटले जाते.

हा 'आम' रस रक्ताभिसरणासोबत संपूर्ण शरीरात पसरतो आणि शरीरातील सूक्ष्म मार्ग म्हणजेच 'स्रोतस' कोंडून टाकतो. जेव्हा स्रोतरोध होतो, तेव्हा शरीरातील वायूचा मार्ग अडवला जातो. मार्ग अडल्यामुळे वायूचा प्रकोप होतो आणि हा प्रकुपित वात संपूर्ण शरीरात पसरून धातूंचे पोषण थांबवतो. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शेवटी शरीराचे मुख्य ओज क्षीण होते. जेव्हा ओज क्षक्षय होतो, तेव्हा माणसाला 'सतत थकवा वाटणे' हा त्रास सुरू होतो.

आधुनिक शास्त्रानुसार हा त्रास क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम, मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन किंवा हॉर्मोनल इमबॅलन्सशी संबंधित मानला जातो. यात तात्पुरती ऊर्जा मिळवण्यासाठी टॉनिक्स, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स किंवा नर्व्ह स्टिम्युलंट्स दिले जातात. मात्र, अनेकदा मूळ कारण पेशींमधील साचलेले टॉक्सिन्स दूर न केल्यामुळे औषधे बंद करताच थकवा पुन्हा येतो.

आयुर्वेद थकव्याला केवळ एक लक्षण मानत नाही, तर ती शरीरातील ऊर्जेच्या चयापचयाची विकृती मानतो. जोपर्यंत स्रोतोशोधन (ब्लॉकेजेस दूर करणे) आणि अग्नीचे दीपन (पचन सुधारणे) होत नाही, तोपर्यंत शरीराला खरी ऊर्जा मिळू शकत नाही. म्हणूनच आयुर्वेद मुळापासून उपचार करण्यावर भर देतो.

प्रत्येक व्यक्तीची शारीरिक प्रकृती (वात, पित्त, कफ) आणि तिची 'अग्निबल' (पचन क्षमता) वेगळी असते. कदाचित तुमच्या मित्राची पचनशक्ती उत्तम असेल, त्यामुळे तो जंक फूड खाऊन किंवा रात्री जागूनही टिकून राहत असेल.

परंतु, जर तुमची प्रकृती वातप्रधान असेल किंवा तुमचा अग्नी जन्मतःच विषम किंवा मंद असेल, तर किरकोळ कारणांनीही तुमच्या शरीरातील संतुलन बिघडते. तुमचे कामाचे स्वरूप (सतत बसून राहणे), रात्री उशिरा जेवणे, जेवल्यानंतर लगेच झोपणे, मनात सतत चाललेली विचारांची चक्रे आणि अनुवांशिक कारणे या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन तुमच्याच शरीरात 'आम' निर्मिती वेगाने झाली आणि हा त्रास उद्भवला.

चुकीची समजूत आणि सप्लिमेंट्सचा मारा: थकवा आला की लोक स्वतःच लॅब रिपोर्ट न बघता किंवा डॉक्टरांना न विचारता कॅल्शियम आणि बी-१२ च्या गोळ्या खातात. जर शरीरात 'आम' साचला असेल, तर या जड गोळ्यांमुळे अग्नी आणखी मंद होतो आणि थकवा कमी होण्याऐवजी वाढतो.
कॅफिनचा अतिवापर: थकवा घालवण्यासाठी दिवसातून ५-६ वेळा चहा किंवा कॉफी पिणे. कॅफिनमुळे नसांना तात्पुरती उत्तेजना मिळते, पण नंतर त्या नसा आणखी कोरड्या आणि कमकुवत होतात, ज्यामुळे वात दोष वाढतो.
विश्रांतीचा अतिरेक किंवा अयोग्य व्यायाम: काही लोक थकवा घालवण्यासाठी दिवसभर पडून राहतात, ज्यामुळे कफ वाढून अंगात जडपणा येतो; तर काही लोक थकवा घालवण्यासाठी जिममध्ये जाऊन ताकदीच्या पलीकडे जड व्यायाम करतात, ज्यामुळे वात वाढून शरीर आणखी झिजते.

"आज करू, उद्या करू" असं म्हणून या थकव्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. जर शरीरातील स्रोतोरोध आणि वात प्रकोप वेळेवर थांबवला नाही, तर हा आजार पुढील गंभीर टप्प्यांत प्रवेश करतो. यामुळे क्रॉनिक इन्फ्लॅमेशन (शरीरात आतून सूज येणे) वाढून सांधेदुखी, अकाली वृद्धत्व, स्मरणशक्ती अत्यंत कमकुवत होणे आणि हळूहळू शरीराच्या सर्वच क्रिया मंदावणे असा त्रास होऊ शकतो. सुरुवातीच्या काळात हा त्रास केवळ दिनचर्या बदलून आणि साध्या औषधांनी बरा होऊ शकतो, मात्र तो जुना झाला की धातूंची झीज भरून काढणे अत्यंत कठीण होते.

जेव्हा दोष शरीराच्या कोष्ठात आणि शाखांमध्ये पसरून जुनाट आजार किंवा थकवा निर्माण करतात, तेव्हा त्यांना केवळ तोंडातून औषधे देऊन पूर्णपणे नष्ट करता येत नाही. अशा वेळी 'बस्ती' (Basti Chikitsa) आणि पचन सुधारणारे उपचार करून दोषांना मुळापासून बाहेर काढावे लागते. दोष एकदा मुळापासून शुद्ध झाले की, तो आजार पुन्हा उद्भवत नाही.

या सततच्या थकव्यावर मात करण्यासाठी त्रिस्तरीय उपचार पद्धती अत्यंत प्रभावी ठरते:

१. आहार आणि जीवनशैलीत सुधारणा

२. व्यायाम, योग आणि प्राणायाम

३. पंचकर्माच - 'बस्ती' उपचार

सततच्या थकव्यामध्ये आणि वात विकारांमध्ये 'बस्ती'हा सर्वोत्तम आणि रामबाण उपचार मानला गेला आहे. अनेकांना वाटतं की बस्ती म्हणजे केवळ पोट साफ करण्याचे एनिमा आहे, पण ते पूर्णपणे चुकीचे आहे.

बस्ती हे आयुर्वेदातील अर्धे उपचार मानले जाते. यामध्ये रुग्णाची प्रकृती आणि थकव्याची तीव्रता पाहून, औषधी काढ्यांचे आणि सिद्ध तेलांचे मिश्रण गुदद्वारावाटे शरीरात सोडले जाते. गुदभाग हा वाताचे मुख्य स्थान आहे. बस्तीचे औषध मोठ्या आतड्यात शोषले जाऊन तिथून ते शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत आणि मज्जासंस्थेपर्यंत पोहोचते.

बस्तीचे कार्य कसे होते? बस्ती शरीरातील साचलेला जुनाट 'आम' आणि कोरडा झालेला वात शोषून घेते. यामुळे स्रोतांचे अडथळे दूर होतात. जसा सुकलेल्या झाडाच्या मुळाशी पाणी घातल्यावर संपूर्ण झाड हिरवेगार होते, तसेच बस्ती उपचाराने शरीरातील रस-रक्तादी सातही धातूंचे उत्तम पोषण होते आणि ओज वाढते. यामुळे काही दिवसांतच शरीरातील थकवा गायब होऊन एक नवचैतन्य आणि नैसर्गिक ऊर्जा अनुभवायला मिळते.

सुरुवातीला ज्या सागर यांच्याबद्दल आपण बोललो, त्यांच्यावर आम्ही वेदाकेअर क्लिनिकमध्ये उपचार सुरू केले. पहिल्या आठवड्यात आम्ही त्यांच्या आहारातील काही मोठे बदल केले आणि अग्नी वाढवण्यासाठी दीपन-पाचन औषधे दिली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीनुसार आम्ही १५ दिवसांचा विशेष योग बस्ती क्रम नियोजित केला.

बस्ती उपचार सुरू असतानाच पाचव्या-सहाव्या दिवसापासून सागर यांना शरीरात हलकेपणा जाणवू लागला. सकाळी उठल्यावर अंगात येणारा जडपणा कमी झाला. १५ दिवसांची बस्ती पूर्ण झाल्यावर आणि अंतर्गत औषधांच्या मदतीने, त्यांच्या शरीरातील 'आम' पूर्णपणे नष्ट झाला. आज सागर कोणत्याही एनर्जी ड्रिंक किंवा चहा-कॉफीच्या अतिवापराशिवाय ऑफिसमध्ये ८-१० तास पूर्ण उत्साहाने काम करत आहेत. संध्याकाळी घरी गेल्यावर ते त्यांच्या मुलासोबत बागेत खेळतात. "डॉक्टर, मला माझे जुने उत्साही आयुष्य परत मिळालं," हे त्यांचे शब्द आमच्यासाठी सर्वात मोठी पावती होती.

तुमचे लॅब रिपोर्ट तुमच्या आजाराचे अस्तित्व दाखवू शकतात, पण तुमच्या आरोग्याची खरी पातळी फक्त तुमचे शरीरच सांगू शकते. रिपोर्ट नॉर्मल असणे म्हणजे तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात असे नाही. शरीराच्या ऊर्जेची पातळी हाच आरोग्याचा खरा आरसा आहे

डॉ. हर्षल नेमाडे

वेदाकेअर आयुर्वेद, पुणे

9028191155

तुमचा अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा किंवा तुमचे प्रश्न विचारा. हा लेख तुमच्या त्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जे नेहमी "मला खूप थकल्यासारखं होतंय" असं म्हणत असतात. एका शेअरमुळे कोणालातरी योग्य उपचारांची दिशा मिळू शकते!

08/07/2026

'सोरायसिस' म्हणजे फक्त त्वचेचा आजार की शरीराने आतून दिलेली धोक्याची घंटा? क्रीम लावून थकलेल्यांनी हे नक्की वाचा!
"डॉक्टर, मी आता लोकांमध्ये जाणं पूर्णपणे बंद केलंय... ऑफिसमध्ये साधे हात जरी टेबलवर ठेवले, तरी पांढरे कोंड्यासारखे खवले गळतात. लोक संसर्गजन्य आजार असल्यासारखे बघतात. या खाजेने रात्रीची झोप उडालीये. मलमं लावून तात्पुरतं बरं वाटतं आणि पुन्हा त्वचा तशीच होते.

हे विदारक बोल आहेत ३४ वर्षीय निलेशचे. निलेशची जीवनशैली म्हणजे दिवसभरात ९-१० तास स्क्रीनसमोर बसणे, रात्रीच्या शिफ्ट्स, चहा कॉफीचे अतिसेवन आणि प्रोजेक्ट डेडलाईन्सचा प्रचंड मानसिक ताण. सुरुवातीला कोपरावर आलेला एक छोटा लाल चट्टा त्याने CREAM लावून दाबला. पण काही महिन्यांतच तो चट्टा पाठीवर, पोटावर आणि डोक्यात पसरला. त्वचा जाड होऊन चांदीसारखे पांढरे खवले साचू लागले. निलेश शारीरिक आणि सामाजिक कोंडीने पुरता खचला होता.

बहुतांश लोक सोरायसिसला फक्त एक साधा 'त्वचारोग' समजतात आणि तिथेच सर्वात मोठी चूक होते. सोरायसिस हा केवळ त्वचेच्या वरच्या थराचा आजार नसून तो शरीराच्या अंतर्गत रोगप्रतिकारशक्तीच्या बिघाडामुळे निर्माण झालेला अत्यंत गंभीर पद्धतशी आजार आहे. सुरुवातीला शरीराचे अंतर्गत रिपोर्ट अगदी नॉर्मल येतात, म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते.

परंतु, हा आजार आतल्या आत शांतपणे वाढत असतो. डोक्यात येणारा कोंडा किंवा नखांना खड्डे पडणे याकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार सांध्यांवर आक्रमण करतो. यामुळे 'सोरियाटिक आर्थ्रायटिस' होऊन सांधे कायमचे निकामी किंवा वाकडे होऊ शकतात. एवढेच नव्हे तर, शरीरातील जुनाट सूज वाढल्यामुळे पुढे जाऊन हृदयविकार आणि डायबेटिसचा धोका कैक पटीने वाढतो.

सोरायसिस केवळ शरीराला नाही, तर रुग्णाच्या आत्मविश्वासाला पोखरून काढतो. बेडवर साचलेले त्वचेचे पांढरे खवले साफ करण्यापासून दिवसाची सुरुवात होते. डोक्यातील खवले खांद्यावर पडतील या भीतीने लोक काळे कपडे घालणे टाळतात.
हा आजार आपल्यालाही होईल या भीतीने नातेवाईक किंवा मित्र जवळ बसणे, हस्तांदोलन करणे टाळतात. कार्यालयात सतत येणाऱ्या खाजेमुळे एकाग्रता भंग होते, ज्यामुळे करिअरवर आणि नातेसंबंधांवर गंभीर नकारात्मक प्रभाव पडतो. सततची चिडचिड आणि नैराश्य रुग्णाला मानसिकदृष्ट्या एकाकी पाडते.
• डोक्यामध्ये तीव्र स्वरूपाचा कोंडा होणे, जो साधा शॅम्पू वापरूनही जात नाही.
• नखांचा रंग बदलणे, नखांवर छोटे-छोटे खड्डे पडणे किंवा नखे ठिसूळ होणे.
• त्वचेवर अचानक लाल रंगाचे चट्टे पडणे आणि त्यावर चांदीसारखे पांढरे आवरण तयार होणे.
• सकाळी उठल्यावर हाता-पायांचे सांधे जखडणे किंवा दुखणे.
• ऋतू बदलताना, विशेषतः हिवाळ्यात त्वचेची आग होणे आणि खाज प्रचंड वाढणे.

निरोगी शरीरामध्ये त्वचेच्या पेशी तळाशी तयार होऊन वरच्या थराकडे येण्यास साधारणपणे २८ ते ३० दिवसांचा कालावधी लागतो. जुनी त्वचा गळून पडते आणि तिची जागा नवीन त्वचा घेते.

आता सोरायसिसमध्ये काय होतं? जसं एखाद्या कारखान्यात मशीन बिघडल्यावर उत्पादन बेसुमार वाढतं आणि कचरा साचतो, तसंच शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच्या अतिसक्रियतेमुळे त्वचेच्या पेशी बनवण्याचा वेग प्रचंड वाढतो. ३० दिवसांची ही प्रक्रिया अवघ्या ३ ते ४ दिवसांत घडू लागते. जुनी त्वचा गळण्यापूर्वीच नवीन पेशींचा थर त्यावर जमा होतो. जसा पाण्याचा पाईप कचऱ्याने अडकतो, तसाच पेशींचा थर एकावर एक साचून तिथे जाड, लाल आणि पांढरे खवले असलेले चट्टे तयार होतात.
आयुर्वेदात सोरायसिसचे साधर्म्य 'किटिभ कुष्ठ' किंवा 'एककुष्ठ' या प्रकाराशी जोडले जाते. ग्रंथात याचे मूळ कारण शरीरातील दोषांचे असंतुलन आणि दूषित रक्तामध्ये सांगितले आहे.

अतिप्रमाणात आंबट, खारट, तिखट पदार्थ खाणे, शिळे अन्न, किंवा दूध आणि मासे एकत्र खाणे (विरुद्ध आहार) यामुळे शरीरात 'आम' नावाचा विषारी घटक तयार होतो. हा विषारी घटक बाहेर न पडल्यास शरीरातील वात आणि कफ दोष अत्यंत प्रकुपित होतात आणि ते रक्ताला दूषित करतात. हे दूषित दोष जेव्हा त्वचेच्या आश्रयाने त्वचा, मांस, लसिका स्थिर होतात, तेव्हा त्वचा खडबडीत, कोरडी आणि जाड होते. हा आजार केवळ त्वचेचा नसून तो यकृत आणि जठराग्नीची विकृती आहे.
आधुनिक वैद्यकशास्त्रात बाह्य लक्षणांना शमवण्यासाठी 'स्टिरॉइड्स' किंवा 'इम्युनोसप्रेसंट्स' वापरली जातात. हे उपचार त्वचेवरील चट्टे तात्पुरते दाबून टाकतात. परंतु, औषधे बंद करताच आजार अधिक तीव्रतेने उलटून येतो, शिवाय यकृत आणि किडनीवर दुष्परिणाम होण्याचा धोका असतो.

याउलट, आयुर्वेद बाह्य मलम लावण्यापेक्षा अंतर्गत शुद्धीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देतो. जोपर्यंत शरीरातील दूषित पित्त, कफ आणि रक्त पूर्णपणे बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत त्वचा निरोगी होऊ शकत नाही, या तत्त्वावर आयुर्वेद काम करतो.
सोरायसिसच्या उपचारात 'वमन' आणि 'विरेचन' या शुद्धीकरण प्रक्रियांनंतर 'बस्ती' हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपचार मानला जातो. सोरायसिसमधील कोरडेपणा आणि तीव्र खाज ही 'वात' दोषाची लक्षणे आहेत. महर्षी चरक यांनी चरक संहितेत म्हटले आहे. शरीराच्या शाखांमध्ये (त्वचा, रक्त, मांस) दोषांना पसरवण्याचे काम केवळ 'वात दोष' करतो. 'बस्ती' हा उपचार थेट पक्वाशयात कार्य करतो, जे वात दोषाचे मुख्य स्थान आहे. जेव्हा औषधी काढ्यांची आणि सिद्ध तेलांची बस्ती दिली जाते, तेव्हा ती आतड्यातील विषारी घटक बाहेर काढते, शरीरातील कोरडेपणा समूळ नष्ट करते आणि रक्ताची शुद्धी करून त्वचेला पुन्हा नैसर्गिक स्निग्धता मिळवून देते.

डॉ. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद, पुणे
९०२८१९११५५

तुमचा अनुभव सांगा!
तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला डोक्यात सतत कोंडा होणे किंवा त्वचेवर खाज येण्याचा त्रास आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा हा लेख गरजू व्यक्तीसोबत नक्की शेअर करा!

07/07/2026

डॉक्टर, औषध कितीही द्या, पण पथ्य नका सांगू!

डॉक्टर, तुम्ही कितीही कडू औषध द्या, मी वेळेवर घेईन. पण प्लीज, मला 'हे खाऊ नका, ते खाऊ नका' असं पथ्य सांगू नका. बाहेरचं खाणं आणि चहा तर मला सोडता येणार नाही!

ओपीडीत अनेक रुग्ण अगदी हक्कानं आणि थोड्या लाडिकपणे ही अट घालतात. आजकालच्या फास्ट-फूडच्या जमान्यात 'पथ्य' (Diet Restrictions) हा शब्द ऐकला की लोकांना ती एक मोठी 'शिक्षा' किंवा उपाशी राहण्याचं फर्मान वाटतं. पण जेव्हा रुग्ण मला औषध घेऊनही पथ्य न पाळण्याची सवलत मागतात, तेव्हा मी त्यांना एक अत्यंत साधं आणि हसवणारं उदाहरण देतो.
समजा, तुम्ही गाडी चालवत आहात. तुम्ही गाडीच्या ॲक्सिलरेटरवर पूर्ण जोर दिलाय, इंजिन जोरात आवाज करतंय, पण गाडी पुढे सरकतच नाहीये! का? कारण तुम्ही गाडीचा 'हँडब्रेक' तसाच ओढून ठेवलाय!
जर तुम्ही हँडब्रेक खाली न करता ॲक्सिलरेटर दाबत राहिलात, तर काय होईल? गाडी तर पुढे जाणार नाहीच, उलट गाडीच्या इंजिनचा आणि क्लच प्लेटचा पार धूर निघेल.

आपल्या शरीराच्या बाबतीतही अगदी हेच घडतं! जेव्हा तुम्ही आजारी पडता, तेव्हा आयुर्वेदिक औषध हे 'ॲक्सिलरेटर'सारखं काम करतं, जे तुम्हाला आजारातून बाहेर (पुढे) काढण्याचा प्रयत्न करत असतं. पण तुमचा चुकीचा आहार, रात्रीचे जागरण आणि जंक फूड (म्हणजेच अपथ्य) हा तो 'हँडब्रेक' आहे, जो तुम्हाला पुन्हा आजाराकडे खेचत असतो. औषध आणि अपथ्य यांची शरीरात झुंज सुरू होते आणि शेवटी शरीर थकून जातं.

आयुर्वेदात एक अत्यंत सुंदर आणि स्पष्ट श्लोक आहे.
विना अपि भेषजैः व्याधिः पथ्यादेव निवर्तते |
न तु पथ्यविहीनस्य भेषजानां शतैः अपि ||

म्हणजेच, जर तुम्ही योग्य पथ्य पाळले, तर केवळ पथ्यानेही आजार बरा होऊ शकतो. पण जर तुम्ही पथ्य पाळत नसाल, तर शेकडो औषधे खाऊनही तुमचा आजार कधीच बरा होणार नाही!

समजा, एखाद्या घरात आग लागली आहे (तुमचा आजार). औषध हे त्या आगीवर मारले जाणारे 'पाणी' आहे. पण जर तुम्ही एका बाजूने पाणी मारत असाल आणि दुसऱ्या बाजूने आगीत 'पेट्रोल' (चुकीचा आहार) ओतत असाल, तर ती आग कधी विझेल का?
जेव्हा तुम्हाला सांधेदुखी किंवा पित्ताचा त्रास असतो, तेव्हा औषध शरीरातील 'आम' आणि दोष बाहेर काढत असते. अशा वेळी पचायला जड असलेले अन्न खाल्ले, तर औषधाची सर्व ऊर्जा ते चुकीचे अन्न पचवण्यातच वाया जाते आणि आजारावर काम करायला औषधाला ताकदच उरत नाही. म्हणूनच औषध चालू असताना 'पथ्य' हे औषधाइतकेच, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचे असते.
रुग्णांच्या मनातली ही सर्वात मोठी भीती असते. त्यांना वाटतं, "एकदा आयुर्वेदिक पथ्य सुरू केलं, की आयुष्यभर फक्त मुगाची खिचडी आणि उकडलेलं अन्नच खावं लागेल!"

हे अजिबात खरं नाही. आयुर्वेदात पथ्याचे दोन प्रकार आहेत, जे समजून घेणे गरजेचे आहे:
व्याधी-पथ्य (आजारी असतानाचे नियम): जेव्हा तुम्ही आजारी असता आणि औषध चालू असते, तेव्हा पाळायचे हे अत्यंत 'कडक' पथ्य असते. यात काही विशिष्ट गोष्टी पूर्णपणे वर्ज्य कराव्या लागतात. (उदा. खोकला असताना गोड आणि थंड पदार्थ पूर्णपणे बंद करणे. वातव्याधी असतांना कडधान्ये खाणे बंद करावे लागतेच).

स्वस्थ-पथ्य (औषध बंद झाल्यानंतरची जीवनशैली): एकदा का तुमचा आजार मुळासकट बरा झाला, औषध बंद झाले आणि पोटातील 'अग्नी' (भूक आणि पचन) पूर्ववत झाला, की तुम्हाला ते कडक पथ्य चालू ठेवण्याची काहीही गरज नसते! तुम्ही सगळे ऋतूनुसार मिळणारे ताजे पदार्थ, गोडधोड आणि तुमच्या आवडीचे जेवण नक्कीच जेवू शकता.
औषध बंद झालं, याचा अर्थ तुम्हाला पुन्हा रोज रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याचा किंवा रोज वडापाव-पिझ्झा खाण्याचा 'परवाना' मिळाला, असा होत नाही. एकदा खड्ड्यातून गाडी गेल्यावर खराब झाल्यावर गॅरेजमधून दुरुस्त होऊन आली, की ती पुन्हा मुद्दाम खड्ड्यातून चालवायची नसते.

औषध बंद झाल्यानंतर तुम्हाला 'हिताहार' शरीराला मानवेल तो आहार पाळायचा असतो. तुमच्या पोटातील अग्नीला जे पचेल, तेवढेच आणि त्याच वेळी खाणे, यालाच खरी जीवनशैली म्हणतात. सणावाराला किंवा कधीतरी बाहेर खाणे शरीर नक्कीच पचवू शकते, पण ती सवय बनता कामा नये.
पथ्य ही तुम्हाला दिलेली कोणतीही 'शिक्षा' नसून, ती तुमच्या शरीराला स्वतःला Heal करण्यासाठी दिलेली एक सुरक्षित आणि स्वच्छ जागा आहे. औषध तुम्हाला आजाराच्या खड्ड्यातून बाहेर काढते, पण पथ्य तुम्हाला पुन्हा त्या खड्ड्यात पडण्यापासून वाचवते.
पथ्याला शत्रू मानू नका, तो तुमच्या आरोग्याचा सर्वात मोठा मित्र आहे!
-
डॉ. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद, पुणे.

06/07/2026

जिभेच्या रंगावरून ओळखा आरोग्याची स्थिती
जेव्हा रुग्ण पचनाच्या किंवा इतर कोणत्याही शारीरिक तक्रारी घेऊन येतात, तेव्हा अष्टविध परीक्षेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून मी नेहमी त्यांची 'जिह्वा परीक्षा' (Tongue Examination) करतो. त्वचा आणि दातांप्रमाणेच आपली जीभ हा आपल्या पचनसंस्थेचा (Gut) आणि एकूणच आरोग्याचा एक अत्यंत पारदर्शक आरसा आहे.

आयुर्वेदात जिभेला 'अन्नवह स्रोतसाचे' (Digestive Tract) प्रवेशद्वार मानले जाते. जिभेचा रंग, त्यावर जमा झालेला थर (Coating), तिचा आकार आणि कोरडेपणा यावरून शरीरात वात, पित्त की कफ कोणता दोष वाढला आहे, तसेच 'आम' (Toxins) किती साचला आहे, याचे अचूक निदान करता येते.

विविध आजार आणि त्यानुसार जिभेच्या रंगात होणारे बदल खालीलप्रमाणे आहेत:
१. पांढरा थर असलेली किंवा पांढुरकी जीभ (White Coated Tongue)
सकाळी उठल्यावर जिभेवर एक हलका पांढरा थर असणे नैसर्गिक आहे, पण जर हा थर खूप जाड आणि चिकट असेल तर ते आजाराचे लक्षण आहे.
• आम दोष आणि अपचन: आयुर्वेदानुसार, जेव्हा खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होत नाही, तेव्हा शरीरात 'आम' (Toxins) तयार होतो. अशा वेळी जीभ जड, चिकट आणि पांढऱ्या थराने माखलेली दिसते. याला 'साम जिह्वा' म्हणतात. हे खराब पचनशक्ती आणि बद्धकोष्ठतेचे (Constipation) स्पष्ट लक्षण आहे.
• ओरल थ्रश (Oral Thrush): हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग (Yeast infection/Candidiasis) आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यावर किंवा अँटीबायोटिक्सचा अतिवापर केल्यास जिभेवर दह्यासारखे पांढरे डाग दिसू लागतात.
• पांडू रोग (Anemia): जर जिभेवर थर नसेल, पण तिचा मूळ गुलाबी रंग जाऊन ती फिकट पांढुरकी (Pale) पडली असेल, तर हे रक्ताची कमतरता (हिमोग्लोबिन कमी असणे) दर्शवते.

२. लाल भडक किंवा स्ट्रॉबेरीसारखी जीभ (Red / Strawberry Tongue)
प्राकृत (निरोगी) जिभेचा रंग हलका गुलाबी असतो. पण जेव्हा ती लाल भडक होते, तेव्हा ती शरीरातील वाढलेली उष्णता दर्शवते.
• पित्त प्रकोप: शरीरात आणि रक्तात पित्त (उष्णता) वाढल्यास जीभ लालसर होते. यामुळे तोंड येणे (Mouth Ulcers) आणि छातीत जळजळ होणे (Acidity) यांसारखे त्रास जाणवतात.
• व्हिटॅमिनची कमतरता (Glossitis): शरीरात व्हिटॅमिन बी-१२ (B12), फॉलिक ॲसिड किंवा आयर्नची गंभीर कमतरता असल्यास जीभ लाल भडक, गुळगुळीत आणि अत्यंत संवेदनशील (आग होणारी) होते.
• कावासाकी डिसीज (Kawasaki Disease) किंवा स्कार्लेट फिव्हर: लहान मुलांमध्ये जिभेवर लाल रंगाचे दाणे येऊन ती स्ट्रॉबेरीसारखी दिसल्यास, हे रक्ताभिसरण संस्थेतील तीव्र दाह (Inflammation) किंवा गंभीर इन्फेक्शनचे लक्षण असू शकते.

३. पिवळसर जीभ (Yellowish Tongue)
पिवळा रंग हा थेट यकृताशी (Liver) आणि पित्ताशी जोडलेला आहे.
• यकृताचे आजार (Jaundice/कावीळ): यकृताचे कार्य बिघडल्यास रक्तातील बिलीरुबिन वाढते आणि डोळे, त्वचेसोबतच जिभेवरही पिवळसर थर दिसू लागतो.
• गॅस्ट्रिक आणि श्वासोच्छवासाचे आजार: अति धूम्रपान, तंबाखू सेवन किंवा पोटातील ॲसिड सतत तोंडात येत असल्यास (Acid Reflux) जिभेवर बॅक्टेरिया वाढतात आणि जीभ पिवळी पडते.

४. निळसर किंवा जांभळी जीभ (Blue / Purple Tongue)
हा एक अत्यंत गंभीर संकेत असून याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे असते.
• सायनोसिस (Cyanosis) आणि हृदयविकार: शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्यास किंवा हृदयाचे कार्य सुरळीत नसल्यास (उदा. हृदयाचे छिद्र किंवा हार्ट फेल्युअर), रक्ताभिसरण बिघडते आणि जीभ निळी किंवा जांभळी दिसू लागते.
• फुफ्फुसांचे आजार: अस्थमा, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस (COPD) किंवा न्यूमोनिया सारख्या गंभीर श्वसनाच्या आजारांमध्ये रक्तात पुरेसा प्राणवायू न मिसळल्यास जिभेचा रंग निळसर होतो.
• वात प्रकोप: आयुर्वेदानुसार, जेव्हा रक्ताभिसरणात वात दोषाचा अडथळा निर्माण होतो, तेव्हा जिभेवर निळसर छटा येते.

५. काळी किंवा तपकिरी जीभ (Black / Brown Hairy Tongue)
जीभ काळी किंवा तपकिरी पडणे हे बहुतांश वेळा बाह्य कारणांमुळे आणि काही अंतर्गत गंभीर दोषांमुळे होते.
• बॅक्टेरियाची अतिवाढ (Black Hairy Tongue): तोंडाची स्वच्छता न ठेवणे, अति प्रमाणात चहा/कॉफी पिणे, किंवा तंबाखू-सिगारेटचे व्यसन यामुळे जिभेवरील 'पॅपिला' (Papillae) वाढतात आणि त्यावर बॅक्टेरिया जमा होऊन जीभ काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या केसाळ थरासारखी दिसते.
• गंभीर वात व्याधी: आयुर्वेदात असे वर्णन आहे की, जेव्हा आजार अत्यंत जुनाट (Chronic) होतो आणि शरीरातील वात दोष प्रचंड

वाढतो, तेव्हा जिभेवर काळेपणा आणि अति कोरडेपणा (भेगा पडणे) दिसून येतो.
आपली जीभ रोज सकाळी तपासून पाहण्याची सवय ठेवा. आयुर्वेदात दिनचर्येमध्ये 'जिह्वा निर्लेखन' (Tongue Scraping) म्हणजेच जीभ स्वच्छ करण्यास खूप महत्त्व दिले आहे. यासाठी तांब्याच्या (Copper) किंवा चांदीच्या (Silver) उलणीचा वापर केल्यास जिभेवरील विषारी घटक (Aama) शरीराबाहेर पडतात आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
जर तुमच्या जिभेचा रंग अचानक बदललेला दिसला, त्यावर सतत जाड थर साचत असेल किंवा तोंड वारंवार येत असेल, तर त्यावर केवळ माउथवॉश वापरून चालणार नाही. हा पचनसंस्थेचा किंवा रक्ताचा आजार असू शकतो, त्यामुळे योग्य क्लिनिकल निदानासाठी नाडी परीक्षा करून घेणे अत्यंत आवश्यक ठरते.
आरोग्यदायी शुभेच्छा!
आपला नम्र,

डॉ. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
Vedacare Ayurved

Address

Office No-1, First Floor, Parihar Chowk, Sahil Apartment, ITI Road, Sindh Society, Ward No. 8, Sadhu Vasvani Nagar, Aundh
Pune
411067

Opening Hours

Monday 10:30am - 1:30pm
6pm - 8:30pm
Tuesday 10:30am - 1:30pm
6pm - 8:30pm
Wednesday 10:30am - 1:30pm
6pm - 8:30pm
Thursday 10:30am - 1:30pm
6pm - 8:30pm
Friday 10:30am - 1:30pm
6pm - 8:30pm
Saturday 10:30am - 1:30pm
6pm - 8:30pm
Sunday 11am - 2pm

Telephone

+919028191155

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedacare Ayurved & Panchakarma Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vedacare Ayurved & Panchakarma Clinic:

Shortcuts

Share